Thursday 20 December 2012



काल ऑफिस मधून निघताना उशीर झाला ..बाहेर तुरळक वर्दळ होती ...शेवटची ट्रेन ..मोजून १०- १२ लेडीज ..एरव्ही कधी भीती नाही वाटली प्रवास करताना ..पण काल कुठेतरी भीती वाटत होती, घरी निट पोहचेन कि नाही याची ...खर सांगू ..अशा वेळेस तूझी खूप आठवण झाली ..वाटल तुला फोन करावा..तुझा आवाज ऐकावा ..तुज्या आवाजाने नेहमी धीर यायचा मला ...मला उशीर झाला कि मी सुखरूप पोहचेपर्यंत तू सतत संपर्कात असायचास ...एकही मिनिट मला एकट वाटायचं नाही ..call ,sms , bbm , FB ..सतत ......तू बरोबर नसलास तरी एक आधार वाटायचा मला ....तू रागवायचास हि खूप उशीर होतो म्हणून ...पण काळजी हि तितकीच घ्यायचास !!!
काल मात्र खूप एकट पडल्यासारखं वाटल , अनाहूतपणे नजर सतत mobile वर जायची , वाटायचं चुकून तरी तुझा एखादा call,sms येईल , खूप भरून येत होत ...आणि खर सांगू ..आजूबाजूच्या भीतीपेक्षा मी एकटी पडलेय याचीच भीती जास्त वाटत होती मला .. कशीबशी घरी पोहचल्यावर न जेवताच झोपले ...मन आणि मेंदू दोन्ही थकले होते ..पण जेवून घे अस हक्काने सांगायला हि तू न्हवतास ...
एक मात्र नक्की जाणवलं या पुढचा चा प्रवास माझा असेल , एकटीचा ..कितीही भीती वाटली तरी ........ bt i always miss u ....always ......
***
२०.१२.१२

Wednesday 19 December 2012

 
 
 
* . 2 )
 
ख्वाब हो ..खयाल हो ...
या हो कोई आंधी ...
धूप हो छाव हो ...
या हो कोई पहेली .........
जब भी आता  हैं खयाल
हम थमसे जाते हैं ..
राह में चलते चलते
युंही रुक से जाते हैं ..
ना देखा हैं रंग ..
ना रूप हैं देखा ...
देखा हैं खयालोमे
उभरता एक चेहरा अन्जानासा ...
एक बार मिलो हमसे
कुछ सवाल हैं अनकहेसे ..
जवाब मिले न मिले ..
हम सांस तो लेंगे सुकुनसे .....
ख्वाब हो ..खयाल हो ...
या हो कोई आंधी ...
धूप हो छाव हो ...
या हो कोई पहेली .........
अस्मी
***

Thursday 13 December 2012





कधी कधी असे हि घडते ..जी व्यक्ती जवळ असते तेव्हा तिच्याशी काय बोलायचे हा प्रश्न पडतो आणि तीच व्यक्ती दूर गेल्यावर तिच्याशिवाय काय बोलायचे हा प्रश्न पडतो ..ती जवळ असताना तिला द्यायला पुरेसा वेळच नसतो आणि तिची जागा रिकामी जाल्यावर फावला वेळ खायला उठतो ...ती असते तेव्हा तिचा फोन कामाच्या व्यापात नाही उचलता येत किंबहुना नंतर बोलू म्हणून तो तसाच वाजत राहतो ..आणि जेव्हा ती कायमची दूर जाते तेव्हा कधीतरी तिचा फोन येईल म्हणून तासंतास त्या फोन कडे डोळे लागून राहतात ....ती असते तेव्हा उगाच झोपही लवकर येते आणि नसते तेव्हा रात्र रात्र जागीच राहते ...तिला आयुष्याचा भाग म्हणून गृहीत धरलं जात ..तीच मन दुखावलं जातंय असा पुसटसा विचारही मनात येत नाही ..अशाच समज गैरसमजातून तीच व्यक्ती दूर झाल्यावर मात्र आपण एकाकी उरलोय याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत राहते ..आणि तेव्हा हातात काहीच उरलेलं नसत ..तिच्या आठवांशिवाय !!!!

Wednesday 12 December 2012

गारुड ...



***
न कळता गुज मनातले उमजून जाते ..
तुज्या शब्दांचे गारुड असले कि मन थिजवून जाते ..
अंधारले क्षितीज तरी मन उजळून जाते
सुरात तुज्या मग मी हरवून जाते ....
तू नीळा सावळा मेघ घननिळा ..
तू इंद्रधनुचा मुघ्ध पिसारा..
तू शहराल्या रातीचा गारवा ..
तू झिनझिन नारा सूर मारवा ...
नादात तुज्या नकळत मी हरवून जाते ....
कधी असे कधी तसे मलाच न कळते ..
तू स्वैर सरींचा पाऊस वेडा ..
तू भासांचा भास खुळा ..
न कळता गुज मनातले उमजून जाते ..
तुज्या शब्दांचे गारुड असले कि मन थिजवून जाते ..
 
 

स्वप्नवेडी ........




 
 
 
 
 
 


 
 
 

 
वादळाची वाट ती , वाऱ्याची साद ही
गुंतल्या रातीची ..गुंतलेली विन ही
उधळून सारे श्वास ती , मिटूनि ही पापणी
काळजाला चिरते ती ...
एक ही स्वप्न वेडी ...स्वप्नवेडी ........
वादळाची वाट ती ..वाऱ्याची साद ही ........१
 
सोडिले केव्हाच मागे, हे सगे अन सोयरे ही ..
उरात उरली रिक्तता अन ओली स्पंदने ही ..
काचेच्या वाटेवरी चालली ही एकटी ..
घूसमटलेली सावली ही ...
एक ही स्वप्नवेडी ..स्वप्न वेडी ...
वादळाची वाट ती ..वाऱ्याची साद ही २
 
शून्य ती , एक ध्यास ती
अवघडलेला श्वास ती ,
भोवतालच्या जंगली
निष्पाप ती , बावरी ती ,
एक ही स्वप्नवेडी ..स्वप्न वेडी
वादळाची वाट ती ..वाऱ्याची साद ही .. ३
....................
*** 
12.12.12

Tuesday 11 December 2012

कोल्याची पोर मी ..

 
 


कोल्याची पोर मी ..चंद्राची कोर ..
कुणाच्या हाताला लागायची नाय ..
वारा हु मैं ..बिजली हु मैं
चंद्राची चमचम चमचम चांदी हु मैं...
छलकता हुंआ एक जाम हाय ..
तुज्याबी ओठाला लागायची नाय ...
कोल्याची पोर मी ..चंद्राची कोर ..
कुणाच्या हाताला लागायची नाय ..................
झिंगरी हु मैं , भिंगरी हु मैं ..
अदा हु मैं, नशा हु मैं ..
गर गर तुलाबी फिरवून जाय ...
तुज्या जाल्यात अशी मी गावायची नाय ..
कोल्याची पोर मी ..चंद्राची कोर ..
कुणाच्या हाताला लागायची नाय ..
अस्मी
११.१२.१२

Monday 10 December 2012

विसरेन मी तुला ..





विसरेन मी तुला ..अस म्हणत किती दिवस सरून गेले .. ती व्यक्ति आजुबाजुला असुनही नसल्या सारखीच ..इतकी परकी की कधी आपण प्रेम केल याचच आच्छर्य वाटाव. मला याच नवल वाटत, एखादी आपल्याला आवडनारी व्यक्ति आपल्या आयुष्यात यावी म्हणून आपण काय करत नाही , किती शक्कल अणि किती बहाने ..सार काही त्या व्यक्तीसाठी असत , वेळ नसूनही तो काढला जातो , छोट्या छोट्या गोष्टी imp ठरतात ..आपल सार काही तीच होउन जाते ..ती व्यक्ति हवीहवीशी वाटत राहते , सगळी सुखदुख शेयर नाही झाली तर चैन पडत नाही , दिवसभराची विश्रांति ठरते ती ...नाही बोललो आपण की बैचेन व्ह्यायला होत , अशी ही व्यक्ति आपल आयुष्य बनून जाते ..अणि मग एक दिवस ब्रेक अप होत अणि हीच व्यक्ति क्षणात परकी होऊन जाते ...इतकी की तिचा आवाजही सहन नाही करू शकत आपण ..मग ते प्रेम ,ती भावना ,ते sharing कस विसरलं जाऊ शकत ? इतक एखाद्याशी नात तोड़ता येत ..टोकाची भूमिका घेता येते ? एक नात जुळल नाही तर मैत्रीच नात नाही रहू शकत का ? या नात्यांच्या गुंतागुंतीच सारच अनाकलनीय ...एखाद्याला पूर्ण समजूनही आपण नाही समजू शकत हेच खर सत्य .....

 ***
 

एक बासूरीवाला........


एक बासूरीवाला........
 
 
 
एक शांत सायंकाळ ....अस्ताला जाणारा सूर्य , त्याच्या धूसर होत चाललेल्या वाटा , अंगाला झोंबणारा गार वारा ........
अशा शांत एकाकी सायंकाळी त्याचा माजा एकांत ....मनात चाललेली चलबिचल ....
माजे डोळे आपसूक बंद झाले होते ....आणि सूर ऐकू आला , त्याच्या बासरीचा .....
अलवार त्याने बासरी ओठाला लावली आणि तो त्याच्याही नकळत सूर छेडू लागला ...
एक क्षण सारा आसमंत त्या धुंदीने बहरला ...त्याचा हर एक सूर मनात उतरत होता , देहात भिनत होता ....
त्याची तन्मयता त्याच्या सुरात उतरत होती आणि मी भान हरपून गेले होते...
आज मी त्याच्याही आणि माज्याही नकळत त्याच्या जवळ आले होते ......अनाहूतपणे .........
एका अनाहूत , मंत्रमुग्ध प्रवासाची सुरवात झाली होती .....
२१.१०.१२

Tuesday 4 December 2012

Chalo Accha Hua ...




एक उम्मीद थी तो इंतजार था ..
इंतजार था क्योंकी उम्मीद थी ..

कल उम्मीद के साथ साथ इंतजार भी मिट गया ...........
चलो अच्छा हुंआ आपने दोनो को मिटा दिया !
पर ये माना जो गया वोह ना लौटा ..
न चैन पाया , ना सुकून पाया ..
उठे सवालोन्के साथ साथ जवाब भी मिट गया ...........
चलो अच्छा हुंआ आपने दोनो को मिटा दिया !
पाने कि आस थी , प्यार कि प्यास थी ..
आपका वजूद जिने कि वजाह थी ..
वजूद के साथ साथ मेरा दिल भी बूज गया ..
चलो अच्छा हुंआ आपने दोनो को मिटा दिया !
०४.१२.१२

Sunday 2 December 2012

आतुरलेल्या मनासाठी माज्या ...y





रोज सकाळी उठल्यावर एक दीर्घ श्वास घेऊन तुज्या हसऱ्या आठवणी श्वासात गच्च भरून घेते मी ..मग त्याच पुरवते दिवसभर कशाबश्या ! रात्री मात्र पुन्हा सकाळची धास्ती .......किती दिवस पुरतील या आठवणी ???? मनही हल्ली नव्या आठवणी मागतोय ..पण तू वाऱ्यासारखा आलास आणि गेलास ..त्या वावटळीत जेमतेम वेचता आल्या तितक्याच आठवणी साठवणी झाल्या ...पण मनाला कोण आणि कस समजावणार , कि वाहून गेलेला वारा उलट कधी वाहत नाही !
पण तरी एक वेडी आशा..वाहशील कधी उलट पुन्हा एकदा ...तुज्यासाठी आतुरलेल्या मनासाठी माज्या ?????


02.08.12

Friday 30 November 2012

वादळ अन तु !!!!


वादळ अन तु !!!!


काल एक वादळ उठल होत , अचानक ...माझ ओळींन लावलेलं अंगण पार विस्कटून गेल अरे . त्या वादळाने जणू त्या अंगणाच्या अस्तित्वालाच धक्का दिला ..मन भरून आल...मला क्षणभर वाटल तूच आलास ..कारण वादळ आणि तू यात बरच साम्य आहे .
आहेच अरे ! तोही एक झंझावात अन तुही !!!!
अनिश्चित , झन्झावती , बेदरकार ...तुही असाच आला होतास अचानक . माज्या शांत आयुष्यात असच वादळ उठवलस , , मन सैरभर करून गेलास , पण जाताना माझ आखलेलं आयुष्य मात्र दिशाहीन करून गेलास ...
अंगणाच काय रे ते पुन्हा आवरता ही येईल , पण मनाच काय करू ? त्याला कस आवरू ? तुज्या जाण्याने पार विस्कटून गेलय ते, मन भर तुज्या आठवांचा पालापाचोळा , तुज्या स्पर्शाचा सैरभर गंध ...नाही पेलवता आला मला तुझा झंझावात ...तुझा बेदरकारपणा .....
म्हणूनच म्हटलं ' वादळ आणि तुज्यात " बरच साम्य आहे ................
अस्मी
30.11.12

Love & Technology : (




फेसबुकवर ओळख झाली ...
chat वर झाल्या गप्पा
देवाण घेवाण नमबरांची
हा झाला पहिला टप्पा ....
black berry ने कमालच केली
सहवासाची २४ तास हमी
कधी पडले प्रेमात
दोघानाही कळलेच नाही....
BBM वरच propose केल
picture ने रेड rose send केल
तिनेही file ने accept केल
हे नात असा BBM वरच जुळून आल.....
मग FB वरच romance आणि
BBM वरच भांडण
दूर देशी असला तरी
त्याच तीच अस मिलन ....
मग समज गैरसमजांच वादळ अंतर
आत्ता आत्ता करता नाहीच आला नंतर
मग BBM वरच अखेरच बोलन
आणि अखेरचा निरोप
तुटल, संपल सार
हाती काहीच ना उरल ...
अशी होती कहाणी त्यांची
Technology ने सुरु झाली
आणि Technology नेच संपली ..
asmi ....

तुज्यासाठी ..............

तुज्यासाठी ,


हल्ली काही तरी वेगळच घडतंय माज्यासोबत ..अरे, आधी तुजी आठवण आली कि डोळ्यात टचकन पाणी यायचं , रडून रडून डोळे सुन्न व्हायचे ,तुज्या कित्येक आठवणी रडवून जायच्या , जिथे जिथे आपण भेटायचो त्या जागा अधिकच रडवून जायच्या , पण आत्ताशा तुज्या आठवणी एक हलकस हसू घेऊन येतात , तुज्याबरोबर घालवलेला हर एक क्षण सुंदर होता , प्रसन्न होता , त्याच आठवणींनी आताशा खूप फ्रेश वाटायला लागलंय मला , त्या जागांकडे बघून आत्ता रडू नाही येत ,तिथे घालवलेला प्रत्येक क्षण न क्षण आठवतो ..आणि एक छानस हसू मात्र येत ...तुज्याबरोबर जगलेला तो प्रत्येक क्षण मला पुन्हा खुणावतो , पुन्हा नवी प्रेरणा देतो ..तुज नसण स्वीकारलंय मनाने ...तरी पुन्हा जगावस वाटतंय आत्ता तसच प्रसन्न ....जसं तू प्रत्येक क्षण माज्यासोबतच आहेस ..तू नसतानाही तू असण्याचा भास घेऊन तुज्या आठवात !!!!

Asmi
01..12.2012
Asahi ghadat kadhi kadhi ....
Asahi ghadat ..kadhi kadhi ...navin chehryanchya jagmagatat june chehre dhusar hot jatat , kityke junya jahkmanvar gairsamjanchi khapali chadat jate . kalachya pravahat apla veg ani disha apanach badlun takto..junya pravahachya virudh ...bhutkal javal javal visrlyatach jama hot jato ..apan sthiravaloy yach bhranat divas nighun jatat ..ani achanak vatevar ek vadal yet , mothya mushkiline kalachi bandhleli bhint pattyansarkhi koslun jate .dolyat swapnbhangachi dhul udate ani mag oghalnarya ashruni dole swach jhale ki toch juna chehra disu lagato . tasach shant , samjutdar aaj hi ..tyachya dolyat prem gavasat ..tech niragas ...khup kahi gamavun punha achanak gavsalyacha anand !!!!! asahi ghadat kadhi kadhi ............
 

Saturday 11 August 2012

तिच्या आठवांशिवाय !!!!

कधी कधी असे हि घडते ..जी व्यक्ती जवळ असते तेव्हा तिच्याशी काय बोलायचे हा प्रश्न पडतो आणि तीच व्यक्ती दूर गेल्यावर तिच्याशिवाय काय  बोलायचे हा प्रश्न पडतो ..ती जवळ असताना तिला द्यायला पुरेसा वेळच नसतो आणि तिची जागा रिकामी जाल्यावर फावला वेळ खायला उठतो ...ती असते तेव्हा तिचा फोन कामाच्या व्यापात  नाही उचलता येत किंबहुना नंतर बोलू म्हणून तो तसाच वाजत राहतो ..आणि जेव्हा ती कायमची दूर जाते तेव्हा कधीतरी तिचा फोन येईल म्हणून तासंतास त्या फोन कडे   डोळे लागून राहतात ....ती असते तेव्हा उगाच झोपही  लवकर येते आणि नसते तेव्हा रात्र रात्र जागीच राहते ...तिला आयुष्याचा भाग म्हणून गृहीत धरलं जात ..तीच मन दुखावलं जातंय असा पुसटसा विचारही मनात येत नाही ..अशाच समज गैरसमजातून  तीच व्यक्ती दूर झाल्यावर मात्र आपण एकाकी उरलोय याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत राहते ..आणि तेव्हा हातात काहीच उरलेलं नसत ..तिच्या आठवांशिवाय !!!! 
asmi 

1.08.2012

एकदा ..

ज्याची भीती होती तेच झाल ....इतके दिवस व्यस्त पणाच वंगण घातलं, दिवस रात्र जागत्या कोरडेपणाने पहारा ठेवला ..एकही अश्रू न ढळू देता ..पण कालच्या कातर वेळेने घात  केला ..जरा कुठे डोळा लागला आणि खिळ खिळ्या  झालेल्या मनाच्या कवाडातल्या आठवणी ते दार लोटून मन भर सांडल्या ..मी क्षणभर थिजले , गोंधळले , पायातलं त्राणच निघून गेल माज्या ..तिथेच बसले मी हताश होऊन त्या आठवांकडे पाहत ..आत्ता पुन्हा या वेचण  अशक्यच होत रे .."तुज्या आठवणी " तुज्या पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या निरोपा पर्यंतच्या  आठवणी " .! 
.डोळ्यातल्या अश्रुनी सार काही धूसर झाल ...किती वेळ सरून गेला कळल नाही ..कातरवेळ सरून मिट्ट काळोख झाला होता ...तुज्या शेवटच्या आठवणीने मात्र दटावल मला .."उठ आत्ता"..पुरे झाल हे दुख कुरवाळण ..माजा नाईलाज झाला ..पुन्हा या सार्या आठवणी गोळा करून तशाच भरून ठेवल्या मनाच्या कोपर्यात..कवाड घट्ट लावून घेतलं पुन्हा एकदा ..
asmi ..

एक सितारा

आज पूर्ण दिवस अस्वस्थेतच जात होता ..मन अंधारून आला होत , काहीच सुचेनास झाल तेव्हा gallerit सहजच उभी राहिले  आणि नजर आकाशाकडे गेली . आज कित्येक दिवसांनी आकाश निरभ्र वाटल कि माज लक्ष खूप दिवसांनी गेल , असो कदाचित .ताऱ्यांनी लगडलेल आकाश खूप सुंदर दिसत होत ,माजी नझर फिरता फिरता अचानक एका ताऱ्यावर  पडली , मी थांबले , अडखळले ,खूप वेगळा वाटला मला तो , इतर तार्यान्सारखाच  पण असामान्य .त्याची चमकच वेगळी होती ,आकर्षित तरीही त्याला कुठला आव न्हवता ,सामान्यातलं असमान्यापन होत त्याच्या चमकेत, इतर सुंदर , बेगडी तार्याहूनही    हा वेगळा भासला मला , त्याच्या भवतालच वलयही लोभस होत , तीव्र आत्मविश्वास जाणवला त्याच्या चमकेत . मी प्रेमातच पडले त्याच्या पहिल्याच नजरेत , अन मग मला वेडच लागल त्याच . कधी एकदा सांजवेळ होते याचीच वाट पाहायचे मी , तो तर कितीही तार्यांच्या गर्दीत मला दिसायचा , जणू तोही माज्यासाठीच थांबायचा , तासंतास त्याच्याकडे पाहूनही मन नाही भरायचं माज ,कित्येकदा तर तो माज्याकडे बघून हसतोय असा हि भास व्हायचा मला , दिवसेंदिवस माझ हे  वेड वाडतच चाललं होत ,, आणि एके दिवशी अशीच त्याची वाट बघत थांबले होते ,आज का कोण जाणे तो मला हुलकावणी देत होता , जणू माज्या प्रेमाची परीक्षाच बघत होता , मी त्याला सैरभैर नजरेने शोधत होते , डोळे अश्रुनी पाणावले  आणि मी त्याला गमावून बसले या नुसत्या विचारानेही एक थंड शहारा उठला , पायातल त्राणच निघून गेल जणू , मी वळणार माघारी तितक्यातच तो दिसला , एक मोठ्या ढगा अडून   जणू माजी अवस्था पाहात होता ..पण कशी सांगणार होते त्याला कि तुज्या या लपंडावाने जीवच गेला असता माजा , मी रागावू मात्र नाही शकले त्याच्यावर , पण आज तो मला उदास वाटला , जणू तो काही सांगू पाहतोय असा वाटल , पण काय नेमक कळत न्हवत , त्याची चमक कमी होत होती , प्रेयसी पासून दूर जाताना प्रियकराची जशी अवस्था असते तशीच काहीशी त्याची ...क्षणभर वाटल त्याने याव मज जवळ , माज्या कुशीत विसावं ..माज भवताल व्यापून टाकावं आणि तो वेगाने माज्याकडे येवू लागला आणि बघता बघता नजरेतून निसटला ..गर्दीत हरवून गेला ..
खूप उशीर झाला होता माज्या भावना त्याच्यापर्यंत पोहचायला ...माजा लाडका तारा निखळला होता ...
आजही आकाशाकडे पाहताना  नजर वळतेच , आजही तो दिसेल अशी वेडी आशा वाटत राहते ,त्यानंताच्या साऱ्याच रात्री सुन्या गेल्या ..त्याची आठवण आली नाही असा एकही क्षण गेला नाही . त्याच ते असामान्यत्व मला आजही व्यापून टाकत , सवइचा  भाग होता तो माज्या आणि तसाच बनून राहिलाय ,
आजही वाटत तो येईल , मला दिसेल , ओळखीच पाहून हसेल , माज तनमन व्यापून टाकेल.. मी वाट पाहतेय ...
आकाशीचा रंगही गहिरा ..त्यात निखळला एक सितारा ...मागितले अस्तित्व तुजे  अन पुसले माजे नाव ..
अस्मी
१०.०८.१२

अंतर्मुख..........

काही काही प्रसंग अंतर्मुख करून जातात ..आपल दुखः  अशावेळेस बोथट ठरत ..असाच एक प्रसंग मी आज सकाळी अनुभवला ...
डोंबिवली- सी एस टी- च्या लोकलमध्ये window सीट   मिळाली तरी पावसामुळे खिडकी उघडू शकत न्हवते म्हणून अधिकच उदास वाटत होत , तितक्यात दिव्याला एक छोटी मुलगी आणि तिची आई चढली , माज्या समोरच्या सीट वर जागा होती म्हणून त्या तिथेच बसल्या , चार साडेचार वर्षाची ती चिमुरडी भलतीच गोड होती , तिने मला पटकन म्हटलं , "तू मला window  सीट देशील , पाऊस बघायचं मला " तिच्या या भिडस्त पनाच कौतुक वाटल मला , तिच्या बोलण्यातून तिची चुणूक जाणवली मला , खूप सारे बालप्रश्न ती तिच्या आईला विचारत होती आणि तिची आईही न थकता उत्तरे देत होती. थोड्या वेळाने बाईसाहेबांची गाडी माज्याकडे वळली.. आणि मग माझ नाव , माझा  mobile  , त्यातली गाणी ,screensaver  बरंच काही विचारून झाल , एकदा वाटल बस आत्ता तुजे प्रश्न ..पण त्यातही गम्मत वाटत होती मला ,एव्हाना तिच्या आईला झोप लागली , ते पाहून ती हळूच म्हणाली , "अग खिडकी उघड ना.. पाऊस बघूया आपण..खूप मज्जा येते पावसात भिजायला ! पण आई मला भिजुच देत नाही "  .जेव्हा मी खिडकी उघडली तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक एक मस्त  फिलिंग देऊन गेली मला, तिची ती smile  आत्ताही लक्षात आहे माज्या, तो निरागसपणा  आत्ताही जाणवतोय मला . तीच स्टेशन आलं, आणि तिच्या आईने तिला हात दिला, ती उभी तर राहिली , पण..पण  चालू नाही शकली , ती दोन्ही पायाने अपंग होती ...मी पाहताच राहिले, तिची आई माज्याकडे बघून कसनुस हसली, thanks  म्हणाली मला window  सीट बद्दल ..मी मात्र नाही हसू शकले, ती चिमुकली छानसा टाटा करून गेली मला ..मी मात्र तिच्या डोळ्यात पाहूच शकले नाही ..माजेच डोळे पाण्याने भरले होते ....ईश्वर करो आणि तिला पुन्हा स्वतःच्या पायाने पावसात भिजता येवो ...आत्ता window  ला बसताना आणि पाऊस बघताना त्या चिमुरडीचं निरागस हास्य मात्र नेहमी आठवेल ...

asmi
11.08.12
7.40 a.m.

Friday 29 June 2012

तू  बरसावेस   असे  वाटते,
आवाज तुजा ऐकावा असे वाटते ,
कळले नाही मी कधीच मजला ,
तुला कळावे मी असे वाटते ....
तू वारा होऊन यावे , तू गारा होऊन यावे ,
बनुनी थेंब तू या तनमनावर सांडावेस,
तू सूर होऊन गावे असे वाटते 
तू व्हावेस श्वास माझे  असे वाटते   ..
तू  बरसावेस असे  वाटते.......
तू आरंभ , तूच सांगता होऊन यावे 
एक निशब्द सांज होऊन रेंगाळावे 
बरसत्या मल्हाराची तू धून व्हावेसे वाटते 
तू आज परतावेस  असे  वाटते .................
तू  बरसावेस   असे वाटते ....

Monday 11 June 2012



तुजी माजी ओळखही पावसाळ्यातलीच ...नुकताच बरसू लागलेला पाऊस हाहा म्हणता चांगलाच जोरदार चालू झाला होता ...मी बस ची वाट पाहात उभी होते, पावसाला मनोमन लाखोली वाहत  , चीड्चीडत ..आणि तू रस्त्यावर साचलेल्या पाण्याचं आणि खोळंबलेल्या traffic च  reporting  करत होतास , byte  साठी समोर आलास तेव्हा मी काय काय बोलले , रस्ते, traffic  , अवेळी आलेला पाऊस , ट्रेन्स  बापरे किती काय काय ...तू हसलास फ़क़्त ..आणि म्हणालास "लिफ्ट देतो" आणि पूर्ण प्रवास काहीही न  बोलता मला घरी सोडलस ..जाताना हि भरभरून हसलास ...

आणि मग आपण भेटतच गेलो ..कधी कुठल्या stop  वर , कधी CCD , कधी कुठल्या स्टेशन वर , कधी कुठल्या मिटींगला , कधी कुठे आणि कुठे ...आणि मग ..योगायोगाने घडणाऱ्या या भेटी ठरवून व्हायला लागल्या ...तास सुधा कमी पडू लागले गप्पासाठी , समाजकारण , अर्थकारण , राजकारण , सिनेमा ते अगदी sycology , media  ..कशालाही बंधन न्हवत आपल्यात ...कितेकदा वाद व्हायचे ..तू हाडाचा Reporter  ..एखादी बाजू चिरफाड करून लोकासमोर मांडणारा ..त्यातल  विदारक सत्य   नेमक बोट ठेवून बोलणारा ..आणि मी स्वप्न्याच्या दुनियेत खेळणारी ..स्वप्नांना चकचकीत बेगड लावून त्याची जाहिरात करणारी ..दोघांची क्षेत्र  वेगळी पण वाट  एकच . पण मला कौतुक होत तुज , तुज्या धडाडीच , बेदरकारपनाच  आणि तितकच तुज्यातल्या हळव्या कवीच ...मला अवघड असणारे सारे प्रश्न तुला सोप्पे वाटायचे ..माज्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुज्याकडे असायची ...सांगता आणि न सांगताही ..
आवडी निवडी जुळत गेल्या .न सांगताही कित्येक गोष्टी  उलगडत गेल्या ..तुला उशीर झाला कि मन घाबरायचं माज, तुजा आवाज नाही ऐकला  कि धाकधूक  व्हायची माजी  ..आणि मला उशीर झाला कि तू हि कावरा बावरा व्ह्यायचास ...कधी रागवायाचास ..तुज हे हक्काच रागवण .. प्रेमात पडले होते मी ..
आणि मग एका सायंकाळी थरथरत्या हाताने आणि ओलेत्या डोळ्यांनी तू माजा हात हातात घेतलास आणि म्हणालास .."माजी ट्रान्स्फर झालीय" एक क्षण मी गोंधळले , घाबरले , आणि दुसर्याच क्षणी तुज्या डोळ्यात आकाश पाहिलं मी ..जिथे तुज्या स्वप्नांना भरारी होती ..तुज आकाश तिथे होत ..तुजे ambitions , तुजे career  सार काही ..बराच वेळ माजा हात तुज्या हातात होता ..आणि निशब्द स्तब्धता ...
तू निघून गेलास ..आणि अचानक एक पोकळी निर्माण झाली .तुज्या addiction चा  त्रास व्हायला लागला मला ..नवीन शहर , नवीन संधी या सार्यात  तू busy  झालास , मी मात्र तिथेच होते ..माज जग न्हवत बदलल ..अंतर वाडत गेल ..दोन दिवसाचं बोलन चार चार दिवसांनी व्हायला लागल ..busy schedule म्हणता म्हणता आपण दूर होत गेलो ..आणि त्यातच माज्या दमाच्या आजाराने मला पार कोलमडून टाकल ..मी नखशिखांत घाबरले होते ..तुजी गरज होती मला तेव्हा ..तुज्या कुशीत  शिरून रडायचं होत मला , तू हवा होतास मला धीर द्यायला ..पण तू busy होतास तुज्या stories मध्ये ..
आणि मग  दुरावा वाडतच गेला ..अनेक समज गैरसमज होत गेले ..माज्या आजाराबद्दल तुला कधीच कळू द्यायचं न्हवत मला ..आणि याचा त्रास हि होऊन द्यायचं न्हवत तुला ..तुज्या पासून दूर जाण्याचा निर्णय माजा होता ,सर्वस्वी माजा ...
पण आज वाटत ..तू अडवायला हव होतस मला ..एकदा तरी. तुज्यावाचून अपूर्ण आहे मी ..आज माज्याकडे तुज्या आठवणी खेरीज काहीच नाहीय रे ..प्रत्येक रस्ता , प्रत्येक गल्ली , प्रत्येक क्षण तुजी आठवण देतो ..संध्याकाळ खायला उठते ..आणि रात्र वेडावून दाखवते ..या वर्षीचा पाऊस कोरडाच सुरु झाला..डोळे मात्र भिजले ...
येशील का रे परत ??? या पावसात देशील मला साथ पुन्हा नव्याने ?????????????

अस्मी 
११.०६.१२

Friday 1 June 2012






तुज्या चीवचीविणे  माजा दिवस उजाडतो ...
झोपी गेलेल्या धमन्यांमध्ये किणकिणतो तुजा आवाज ...
तू उतरतेस पापणी अल्याडच्या गर्द अंधारात ..
उबदार प्रकाशाची सोनेरी तिरीप होऊन ...
आत्ता  तू करत नाहीस झोपमोड..
आत्ता  तुज व्यसन नाही उरलं..
तू झाली आहेस माज्या असण्याचा आश्वास..
उरलेल्या लक्ख दिवसाचा लसलसता विश्वास ......
***
2011

Wednesday 30 May 2012





काळोखाच्या पहाडा समोर  तू माज्या प्राक्तनाची पणती  ठेवलीस  आणि म्हणालीस , " जा ..निशंक  मनाने  जा ..आकाश तुजे आहे आणि मीही तुजीच आहे "  एरव्ही असतो आपण , भविष्याची भिंत चाचपडत अंधारात ..सरपटनाऱ्या  शंकेवरती  आपला पडत राहतो पाय ..वारंवार ..डंख होतो ..कापर होत मन . ..." पण सांग ..अस्तित्वाच्या दगडावर विश्वासाची चिन्नी होऊन तू माज्यासाठी थांबशील का ?????? 
***

Wednesday 9 May 2012

काही नाती मुळातच किती हळुवार , नाजूक असतात ..ध्यानी मनी नसताना अनेक  ओळखीच्या चेहर्यापैकी अचानक एक चेहरा खूप जवळचा वाटायला लागतो , वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखा ...त्या व्यक्तीचा आवाज खूप जवळचा वाटायला लागतो , त्याच्यावरच्या विश्वसाच पारड जड होत जात ..कित्येक गोष्टी share करण्यासाठी ती व्यक्ती safe वाटू लागते ...कळत नकळत एक बंध जुळू लागतो ..आणि गम्मत म्हणजे हि व्यक्ती अगदी समोर नसतानाही हे नात निर्माण होत ..विश्वास नाही बसत ..पण हे सत्य आहे..phone freind , chat frend हा त्यातलाच प्रकार आहे ...न बघता  ..न भेटता ती व्यक्ती आपल्यासाठी सवईचा एक भाग होऊन जाते..हेच नात कधी मैत्रीत बदलत ..तर कधी प्रेमात ..आणि हेच नात कधी मैत्रीच्या पलीकडे पण प्रेमाच्या अलीकडल होऊन राहत ..नात्यांचा गूढपणा, त्यातली गुंतागुंत सारच मजेशीर ..कधी व्यक्त होऊन अव्यक्त राहिलेलं तर कधी अव्यक्त राहून खूप काही बोलून , देऊन गेलेलं ....

Monday 7 May 2012

तू धाडावा सांगावा कधी , 
शुभ्र  घनांवर काळ्या शाईने ,
बरसावे ते शब्द होऊनी..
 चिंब भिजल्या सरीने ,
नभ नाचावे फेर धरुनी  अन ताल धरावा विजेने,
स्पर्श होता या मल्हाराचा , तुला स्मरावे मिठीने ...
अस्मी ....

Thursday 2 February 2012

मज आठवण तुजी येते ....

मज आठवण तुजी येते ....
अवेळी भास तुजा होता 
डोळ्यात ढग आसवांचे दाटता
मज आठवण तुजी येते ...
हे गंधित वारे कळतील का तुला 
या पावसात चिंब तुही होशील का 
साठून येता मनात असे 
मज आठवण तुजी येते ...
कधी झंकारतो अवचित मारवा 
तनमनावर तूजाच शहारा 
कातरवेळ उरी दाटता 
मज आठवण तुजी येते ..
कधी भास तू कधी आभास होता 
कधी व्यक्त मोरपिसारा बनता
कधी स्वप्नाचे हि भय वाटता 
मज आठवण तुजी येते .....
अस्मी 
०२.०२.१२

Tuesday 17 January 2012


तुझा  ध्यास...
सार काही अंधारून आल 
पण तुझे  शब्द होते सोबतीला 
सार काही मिट्ट झाल 
तरी तुझा  ध्यास असा  जीवनाला ..
तुज्या शब्दांनी मिळाली दिशा 
नवे गीत नव्या आशा
सूर  तुझे पुरानेच छेडता
मिळे नवी लय स्वप्नाला 
 तुझा ध्यास असा जीवनाला ...
भास , आभास , राग , अनुराग 
तुज्यासवे चांदण्यांचा साज 
श्वासांसाठी हवा मजला 
नित्य तुज्या शब्दांचा पसारा 
 तुझा असा ध्यास जीवनाला ...
अस्मी '
१८.०१.२०१२