Friday 22 July 2011

ओढ............***


For Some 1...................


पाखरांना ओढ आकाशीची
चांदण्यांना काळोखाची
सावलीला भासाची 
अन मला फ़क़्त तुजी .....
तू भास कि आभास
तू सत्य कि स्वप्न 
तू वारा कि किनारा 
तू निषाद कि मारवा ..
तुज्यासव तिमिर हि उजळते 
डोह माजे गहिरे होते 
डोळ्यात तुज्या मी हरवून जाते 
ओढ अशी तुजी का मला लागते????????? ................
अस्मी 
२२.०७.२०११

Tuesday 19 July 2011

कधी कधी पाऊस.........



कधी कधी पाऊस खुळ्यागत वागतो
तू नसताना अचानक येतो 
चिंब चिंब भिजवून जातो 
उगा वाकुल्या दावतो ........
कधी कधी पाऊस खुळ्यागत वागतो 
तुज्या आठवांना उगा छेडतो
कधी हसवतो अन कधी रडवतो 
कधी अंतर्मुख हि करतो ..........
कधी कधी पाऊस खुळ्यागत वागतो 
पाऊलाना उगा सागरी खेचतो 
सैरावैरा मला घूमवतो 
ओल्या वाळूतिनी मग तो
उगा तुजे नाव कोरत बसतो ............
कधी कधी पाऊस मात्र शहाण्यासारखा वागतो 
चिंब केले तरी ,तुज्या आठवणी मनी जपतो 
अनु पुन्हा पुन्हा येईन मी असाच,
हळूच कानी सांगून जातो ....
कधी कधी पाऊस .....
asmi 
१८.०७.२०११

Monday 18 July 2011

एक नजर तुझ्या प्रेमाची......................​............


एक नजर तुझ्या प्रेमाची
रात्र पारिजातकाची
धुंदल्या  दिशा दाही
हि नशा चांदण्याची..

एक नजर तुझ्या प्रेमाची
हळुवार मोहोरुनी गेली
स्पर्श तुझा होता
हि कळी बहरून आली...

एक नजर तुझ्या प्रेमाची
मी वात जणू समईची
मी गाज धुंद वाऱ्याची
मी लय तुज्या गीतांची.... 



एक नजर तुझ्या प्रेमाची
मी पाखरू भरल्या आकाशी 
झाले एकरूप तुज्या पावसाशी 
हि साक्ष तुज्या माज्या प्रीतीची ...
एक नजर तुज्या प्रेमाची ....

asmi ....

Wednesday 13 July 2011

एक हि पाऊस वेडी ..............


एक सर होती खुळावलेली 
माज्या ओंजळी पडली
माज्याशी खुदकन हसली 
अन पापण्यात विसावली............
एक सूर होता नादावलेला
माज्या ओंठावर आला 
नव्याने तो मला गवसला
माज्या अंतरंगात जीरपला ..............
एक कातरवेळ बावरलेली
जिने कधी तुजी वाट पाहीली
रात्रीच्या गर्दात ती 
रडून कुशीत माज्या विरघळली......
एक वेडी आठव तुज्या माज्यातली
रात्रभर छळत गेली
माज्या एक एक श्वासातुनी 
ती मला बिलगत गेली ......
एक अशी हि  पाऊस वेडी 
तुज्यात गुंतली 
तुज्यासवे  नव्याने एकदा 
पाऊस होऊन दवात भिजली ................
 अस्मी 
१३.०७.२०११

Saturday 9 July 2011

गेल मन पावसात भिजुनी ...............





मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी 
वळचणी होत्या कधी तुज्या आठवणी 
झाल्या वाहत्या बघ डोळ्यातुनी 
मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी ....!
दाट भरले धुके भवताली 
नभ विसावले तळहाती
शहारती रोम रोम पाती
गंध भरली ओली माती 
मेघ झरती झरती आभाळातुनी  .........!!
धून भरली पाव्यातुनी 
गीत तुजे माज्या ओठातुनी 
स्पंद स्पंद गेला जन्कारुनी 
अंगणी आला मोगरा बहरूनी 
मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी ....!!!
कधी झेलला पाऊस तुज्या कवेतुनी 
कधी शहारला तो रोमरोमातुनी 
आज एकटा पाऊस  अन मीही एकटी 
जाहल्या पोरक्या तुज्या माज्या आठवणी 
मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी ....!!!!
अस्मी 
०९.०७.२०११

Thursday 7 July 2011

तुजी वाट पाहताना .............







अजूनही थबकते मी याच वळणावर
 तुजी वाट पाहताना 

जिथे कधी झाल्या तुज्या माज्या
 वाटा वेगळ्या  नेहमीकरता 
आयुष्यात अशा अनेक वाटाना 
 पुन्हा पुन्हा फाटे फुटले 
पण याच वाटेवर आहे 
नेमके रुद्याचे शल्य रुतलेले 
अजूनही थबकते मी याच वळणावर तुजी वाट पाहताना ...........
पहिलीत मी आयुष्यात
 नाती बदलत जाताना 
प्रत्येक वळणावर नात्यांच्या 
गरजा पालटताना 
अपेक्षांच्या ओझ्याखाली 
पुन्हा पुन्हा दबताना 
रोजच रोखलंय आसवांना
  तुजी आठवण येताना 
अजूनही थबकते मी याच वळणावर तुजी वाट पाहताना .........
खूप दूर गेल्यास तू
 जिथे साद हि  जाईना
तरी अडतंय पाऊल 
त्या वळणाकडे बघताना 
 पाहिलंय त्या वळणाने 
तुजी माजी पहिली भेट घडताना 
अन पाहिलंय त्याने तुला मला
 कायमच विलगताना  
अजूनही थबकते मी याच वळणावर तुजी वाट पाहताना ............
अस्मी
 ०७.०७.२०११

Wednesday 6 July 2011

मन ग सई माज .....




मन ग सई माज वेड ग वेड पाखरू 
कशी आवरू ग त्याला , कशी ग सई  मी सावरू 
कसा ग सई उडे त्याच्या लई लई आठवणी 
कधी कसे ग धावे , कधी कसे हे ठेचकाळे 
मन ग सई माज वेड ग वेड पाखरू .....
कशी आवरू ग त्याला , कशी ग सई  मी सावरू 
मन ग सई माजे झोका ग झोका होई 
मनाच्या महाली त्याच्या कस फिरुनी फिरुनी येई 
लई घाबरे ग विरहाला, घट्ट घट्ट ग बिलगून राही 
मन ग सई माज वेड ग वेड पाखरू .....
अस्मी 
०७.१०.२००९


ऋतू मागुनी ऋतू हे सरती 
परी तुजी आठवण न सरे
वेड्या मनाला भुलवी कैसे 
जरी कोणी  आणले चंद्र अन तारे .....
पल्याड क्षितिजा तुजे असणे 
परी भासातून तुजे हसणे 
वळवाचा पाऊस खुळा तो 
क्षणात तुजे ते ओघळणे 
ऋतू मागुनी ऋतू हे सरती 
परी तुजी आठवण न सरे...............
पाऊल खुणा हि तुज्या चाहुली 
अभासते मी तुजी सावली 
खोल खोल डोहात गुरफटती 
माज्या मनातल्या तुज्या आठवणी 
ऋतू मागुनी ऋतू हे सरती 
परी तुजी आठवण न सरे......
अस्मी 

तू राजा अन मी राणी ...



प्रीत तुजी नि माजी एक अबोल कहाणी 
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी 
रोजचेच ते अपुले जगणे , रोजचीच ती वाणी 
गीत कसे मांडावे अपुले त्याच त्यच शब्दांनी 
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी ....
हात दिला हाती तुजीया संसाराच्या या वळणी 
पसाऱ्यात  पण त्याच्या उरल्या केवळ  आठवणी 
हाती केवळ तडजोडी ,उगा वेडावतो हा चंद्र नभी 
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी ......
अस्मी 

मन झाले ग बेभान.......

मन झाले ग बेभान.......
डोळ्यातून वाहे सई आठवांचा श्रावण 

कशी आवरू त्याला मन झाले ग बेभान
नभ उतरू उतरू आले 
त्याला आकाशीचे कोंदण 
परी नाही ग सी माज्या मनाला वेसन !
येती सारी जाती बिलगुनी जाई जुईला 
परी राहती कोरड्या कोरड्या आठवणी वळचणीला                                     
नाही ग थारा वारा जिम्माड बावळा
बघ  उडवी कसा .. आठवांचा ग पाचोळा
डोळ्यातून वाहे सई आठवांचा श्रावण 
कशी आवरू त्याला मन झाले ग बेभान..........
अस्मी 
२५.०७.२००९

Tuesday 5 July 2011

Ek Patra Tula Shevtch .....

प्रिय,

माहित नाही तुला आजही प्रिय म्हण्याचा अधिकार मला आहे कि नाही ..तरीही तू प्रियच आहेस ..आजही ...तुला थोड विचित्र वाटेल अस माझ पत्र लिहीन.., पण कधी कधी शब्द मुके होतात आणि मग ते असे कागदावर उमटतात , तुला आजवर कधीही माझा भावना समजल्या नाहीत, तुला माहित नसेल तू माझा जीवनात एखाद्या हवेची झुळूक यावी तसा आलास पण नकळत कधी माझा जीवनात वादळ पसरून निघून गेलास तुला कधी वाटल ही नसेल परत मागे बघाव पण ती दुपार आज हि आठवते....


सर्वत्र शांतता होती ,मधेच पक्षाचं किलबिलाट होत होता आणि ग्रीष्मातल्या कडक उन्हाने तापलेला रस्त्याची झळ जाणवत होती. झाडांची सळसळ मंदावली होती.पाचोळाही निपचित पडला होता , अगदी सारी कवाडे बंद असतानाही झोपाळ्यावर उन्हाची तिरीप पडली होती..पण तो पारवा मात्र मजेत शिळ घालत हिंदळत होता ...

नकळतस कुठूनसा सुसाट्याचा वारा सुटला , त्या सोसाट्याच्या वाऱ्याने सर्व कवाडे ताड ताड उघडली गेली. तो वारा घरभर भिनला, जोराने झोंबला . आणि क्षणार्धात रस्ता ओला चिंब झाला. त्याच येन अंगणभर घुमून राहील ... तो आला अवचित,कसलीही चाहूल न देता , एखाद्या वादळासारखा , मागून मिठी घालणारा तुजा - माझा लाडका पाऊस ....

पण तो नुसताच आला नाही , एक वादळ घेऊन आला , येताना त्या वादळाने मनाची सारी कौलच उडवून दिली.इतके दिवस जपलेल्या कोपऱ्यातला आठवणीचा पालापाचोळा सैरभैर उडाला आणि त्या आठवणी सर्व उधुलून लावल्या. त्या वेचताना पुन्हा एकदा माझे पाय काट्यात रुतले आणि रक्तबंबाळ झाले , तुही असाच आला होतास एखाद्या वादळासारखा, माझी सर्व स्वप्न सार आयुष्य ढवळून निघाल होत ..निरागस शांत मनामध्ये बरीच उलथापालथ झाली होती , सैरभैरल्यागत दिवस होते ते सारे ..
त्या आठवनीच्या मागे धावताना बरेच तुकडे पुन्हा हाताशी आले , झरझर आठवणीने मी मागे गेले , त्याच वळणावर पुन्हा पोहचले , जिथे तू मला सोडून गेला होतास कधी ...

प्रीतीच्या उंबरठ्यावर नुकतच पाऊल ठेवलं होत. आयुष्यातल्या जोडीदाराच्या व्याख्या सुधा नीट उमजत न होत्या आणि तू भेटलास ..तुज्या पहिल्याच नजरेत मी तुझी झाले , तुज्या डोळ्यात स्वताला हरवून बसले , तुझ अशा अवचित क्षणी येण्याने मी बहरले होते स्वतः मध्ये हरपून गेली होती, त्याक्षणी मी स्वतःची ही उरले न्हवते , तुझा मध्ये विलीन झाले होते .. माज्या जोडीदाराच्या चौकटीत तुला बसवल होत ...एवढा विश्वास तुझा वर टाकला होता ....
पण तू एखाद्या फुलपाखरासारखा आलास , विश्वासाने तळहातावर हात ठेवलास आणि मी विश्वासाने तुझा खांद्यावर डोक ठेवणार तितक्यातच वाळूसारखा बोटातून निसटून गेलास मला तिथे एकटीला सोडून ... अरे पण ..

"काही नाती तुटत नाहीत
ती मनाच्या गाभार्यात राहतात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे उडून जातात " पण तुला काय त्याच
ए आठवतंय तुला .. तुज माझ्यासाठी तासंतास वाट पाहन , उशीर झाला कि रागवण अन मी कान पकडल्यावर तुज दिलखुलास हसन आणि कधी मी रागवल्यावर तुज मनवन, मला कुशीत घेऊन समजावन ,पण तुला एक सांगू ? तेव्हा मलाही समजूतदारपणा कधी दाखवावासा वाटलाच नाही तुज्या अशा साम्जाव्ण्यामुळे ;-) अरे पण मी समजूतदार झालेय आत्ता , कारण माजी समजूत घालायला तू नाहीयास न ...
आणि आठवतंय तुला कलत्या सांजेला तुज्या खांद्यावर डोक ठेवून पाहिलेला सूर्यास्त... आजही एकटी तुज्या आभासात त्याचे रंग मी पुन्हा पुन्हा अनुभवते , आपला चांदण्या रात्रीत समुद्रावर फिरन , ती ओली वाळू. तिचा तो ओला स्पर्श आजही तुजी वाट पाहतोय तो सागर , तुज्या मोहक स्पर्शाने माझ शहारण , ती मिटत चाललेली चंद्राची कोर माझा मनामध्ये पुन्हा पुन्हा कोरते मी ...
आठवत नसेलच तुला ....,तू तर अर्ध्यावर सोडून गेलास , आजहि आपली लाडकी रातराणी मलूल होऊन तुजी वाट पाहते , माज्या वाढदिवशी तू दिलेलं गुलाबच रोप त्यानंतर कधी बहरलच नाही. ते आजही तुज्या वाटेकडे डोळे लावून बसल आहे. चुकले का रे काही माझ ? सावरायला , विचारायला वेळच दिला नाहीस ? खूप प्रयत्न केला मी पुन्हा सावरायचा पण तू तर काचेला तडा देऊन निघून गेला होतास. जाताना मात्र पाठीमागे प्रश्न..आणि प्रश्नच ठेवून गेलास .., विचार करून करून मेंदू बधीर झाला , आणि माझे डोळेही तुज्या आठवात फितूर होऊन रात्र रात्र जागत राहिले , कधीही न मिळणाऱ्या उत्तराची चातकापरी वाट पाहत राहिले ..तू हवा होतास इथे या कोसळणाऱ्या पावसाला आवरायला ...

मला काहीच सुचेनास झाल होत आणि माझी पाऊले आपसूकच समुद्राकडे वळली , भान हरपले होते.. वाऱ्यासारखी भरकटत होते समुद्रात नाव जशी भरकतावी तशी मी त्या सागराकडे ओडली जात होते ..
....!कोसळणारा पाऊस मी म्हणत होता , तो अंगभर सुयान्सारखा टोचत होता आणि डोळ्यातले अश्रू मन भिजवून टाकत होते , मी वेड्या सारखी चालतच होते वाट फुटेल तिथे आणि अचानक माज पाऊल थांबल, पुन्हा एकदा समाजाच्या रीतीभातीच्या उंबरत्यावर , मी वळले मागे ..

आणि तसही , " पुन्हा पावसाला सांगायचे , भिजुनी घरी रोज परतायचे " हे ठाऊक होत मला ..मग मीही वळले , हा पाऊस मनात भरून पुन्हा एकदा ...नव्याने तुजी वाट पाहण्याकरता , नव्याने हा बेभान पाऊस झेल्ण्याकर्ता ...मी परतले होते तुज्या माज्या लाडक्या रातराणीला श्वास देण्याकरता ..मी परतले होते..आणि तसही , "काही क्षण हसरे असतात ते पकडता येत नाही म्हणून रुसायचं नसत, हा आठवणीचा पाऊस मनात दाटून येताना मिटायच नसत ...कदाचित म्हणूनच मी परतले होते .

आता इतकच कर , मी अनंतात विलीन होताना तरी एकदा ये ... माज्या प्रेताला घट्ट कवटाळून माज्यावर उधळलेल्या प्रेमाची साक्ष दे , उर भरून रडून घे, तेच अश्रू साथ देतील मला माज्या अंतापासून .. अनंतापर्यंत ..
करशील न एवड...
येशील न पुन्हा माघारी त्याच वळणावरी...

तुझीच
xxx

Monday 4 July 2011

व्यवहार.....











मला एक किनारा हवा होता 
तू फ़क़्त फटकारनाऱ्या लाटा दिल्यास 
मला हवा होता शीतल गारवा
तू फ़क़्त ग्रीष्माच्या झळा दिल्यास ......
काय गमावले मी काय कमावले 
तुज्यापायी आयुष्य खर्ची घालून
काय साध्य केले .......
कधी जुळल्याच नाहीत आपल्या वाटा
कधी जुळलेच नाहीत सूर 
भातुकलीचा डाव सारा 
कधी रंगलाच नाही नूर .........
आत्ता फ़क़्त धुरकट सोबत आहे 
दोघांमध्ये अस्पष्टशी भिंत आहे 
काचेला तडा केव्हाच गेलाय 
केवळ आत्ता संसाराचा व्यवहार उरला आहे .....
अस्मी ..
०५.०७.२०११

ऐकणारे ...ऐकणारे ...ऐकणारे....







चिंब भिजलेल्या 
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे ...ऐकणारे .................
साद घाली मला 
हा नखरेल वारा 
ओढी मला  
या सागर लाटा
जाऊ कुठे सांग ना रे..सांग ना रे ...सांग ना रे
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे ........!
तो असा तो तसा 
तो... सळसळत्या  धारा 
तो भास हा आभास हा 
तो माजा किनारा 
जाऊ कुठे तुज्याविना रे ...तुज्याविना रे ......
ऐक नारे ऐकणा रे माज्या मना ,माज्या मना ....................
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे !!
तो पाऊस कोसळणारा 
तोस्पर्शाचा ओला शहारा 
तो माज्या मनीचा कवडसा 
त्याच्या विना हा जन्म बावरा  
ऐक नारे ऐकणा रे माज्या मना , माज्या मना ....................
चिंब भिजलेल्या 
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे .........................!!!!
अस्मी 
०३.०७.२०११

Friday 1 July 2011

शेवटचा फोन ....***







शेवटचा फोन ....
आजही तिचा फोन वाजला
तीच परिचित रिंग आणि तोच परिचित नंबर
तिची तीच अधीरता आणि श्वासाचं अंतर ...
तोच हुंकार त्याचा कानी आला
जणू तिच्या जीवात जीव आला
चेहरा खुलला , मारवा जन्कारला
जीरपत गेला आवाज पलीकडला ....
पण तेच होते बोलणे अन तेच होते सांगणे
जीव चोरून पुन्हा पुन्हा तेच होते ऐकणे
तोच होता सूर समजावनीचा त्याचा
आणि तिचा निचय ना समजण्याचा ....
पुन्हा पुन्हा येत होत आभाळ दाटून
आवाज जात होता हळू हळू विरून ...
"बोलन आपलं शेवटच ...संपल सार आत्ता
कधीच येणार नाही फोन माजा आत्ता तुला ....
मग तो बोलताच होता कितीतरी वेळ
तिला लागताच न्हवता कशाचाच मेळ
मग कधीतरी फोन त्याने दिला होता ठेवून
ती मुकी बाहुली गेली होती कोसळून ....
फोन आत्ता त्याचा कधीच येणार न्हवता
जीव आत्ता तिचा कधीच, कुठेच गुंतणार न्हवता .....
अस्मी
१२.०५.२०११